देश

आम्ही लक्ष्यभेद करतो; संख्या मोजत नाही; हवाई दलाचे स्पष्टीकरण 

वृत्तसंस्था

कोईम्बतूर : लक्ष्यभेद झाला आहे की नाही, केवळ याकडेच हवाई दलाचे लक्ष असते. लक्ष्यभेदानंतर त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे, असे स्पष्ट करत हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी बालाकोट हल्ल्यातील हानीबाबत विधान करण्यास नकार दिला. 

भारताच्या लढाऊ विमानांनी 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केल्यानंतर हवाई दलप्रमुखांनी आज प्रथमच पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, असे त्यांना विचारले असता, "आम्ही मानवी हानी मोजत नाही, लक्ष्यभेद झाला की नाही, इतकेच पाहतो. त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये किती जण होते, हे आम्हाला माहीत नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. हल्ल्यामध्ये आम्ही किती लक्ष्यांवर निशाणा साधला, किती हुकली, एवढेच आमचे मूल्यांकन असते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या विमानांनी टाकलेले बॉंब दुसरीकडेच पडले, असे काही अहवालांमध्ये म्हटले असल्याबाबत त्यांना विचारले असता, धनोआ यांनी "आमच्या अहवालात वेगळेच आहे,' असे सांगत आपल्या वैमानिकांवरील विश्‍वास व्यक्त केला. निश्‍चित केलेल्या जागी आम्ही बॉंब टाकले आणि ते बरोबर पडले; अन्यथा पाकिस्तानने प्रत्युत्तर कशाला दिले असते, असा युक्तिवादही त्यांनी केला. 

पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना अमेरिकेकडून घेतलेल्या एफ-16 विमानांचा वापर केला होता. त्याबाबत बोलताना धनोआ म्हणाले,""अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एफ-16 च्या वापराबाबत काय करार झाला, ते माहीत नाही. मात्र, या विमानांचा वापर केवळ संरक्षणासाठी करण्याची अट असल्यास पाकिस्तानने या अटीचा भंग केला आहे. त्यांनी एक एफ-16 विमान गमावले असल्याने या विमानाचा वापर झाल्याचे आपोआपच सिद्ध होत आहे.'' 

राफेल विमाने असती तर परिणाम वेगळे असते, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर मत मांडणे धनोआ यांनी टाळले. मात्र, आपण वापरलेली मिग -21 ही विमानेही सुधारणा केलेली आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली होती, असे त्यांनी सांगितले. 

अभिनंदनचा फिटनेस महत्त्वाचा 
पाकिस्तानच्या ताब्यातून परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पुन्हा लढाऊ विमानातून उड्डाण करतील की नाही, हे त्यांच्या वैद्यकीय चाचणीवर अवलंबून असल्याचे हवाई दलप्रमुख धनोआ यांनी स्पष्ट केले. विमानातून उडी मारल्यामुळे त्यांच्या शरीराला कितपत हानी झाली आहे, याची तपासणी सुरू आहे. त्यांना सर्व उपचार दिले जात आहेत. तंदुरुस्त असल्याचे सिद्ध झाल्यास अभिनंदन पुन्हा कॉकपीटमध्ये बसू शकेल, असे ते म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT