Flight
Flight Sakal
देश

सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : कोरोनाची (Corona) रूग्णसंख्या जरी झपाट्याने कमी होत असली तरी, खबरदारीची उपाय म्हणून सरकारकडून व्यावसायिक प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवर पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू राहतील, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सोमवारी (दि.28) जारी केलेल्या आदेश स्पष्ट केले आहे. (All Commercial Flights Ban Till Further Order)

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या रूग्णसंख्या जगासह भारतातदेखील (Corona Update India) घट होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढता प्रकोप रोखण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय (International Flights Ban In India) विमान सेवांवर निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जारी करण्यात आले होते. आज यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मालवाहू आणि DGCA मान्यताप्राप्त उड्डाणांवर हा निर्णय लागू राहणार नाहीये, तसेच संबंधित आदेश बबल व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या विमानसेवांसाठीही लागू होणार नसल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

23 मार्च 2020 पासून उड्डाणे बंद

यापूर्वी, देशातील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे, सरकारने व्यावसायिक प्रवासी सेवेवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. 23 मार्च 2020 पासून भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे कोरोनामुळे बंद करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT