Allahabad HC
Allahabad HC esakal
देश

Allahabad HC : 'सप्तपदींशिवाय हिंदू विवाह अपूर्णच, अशा लग्नाला मान्यता नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन होय. लग्नामध्ये दोन्ही कुटुंबे एकत्र येतात. हिंदू धर्मामध्ये लग्नाला विशेष महत्व आहे. पारंपारिक रितिरिवाजाप्रमाणे लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातात.

लग्नामध्ये सात फेरे किंवा सप्तपदी घेतली जाते. हे सात फेरे घेत असताना नवरा-नवरी एकमेकांप्रती वचने घेतात. त्यामुळे, या सात फेऱ्यांना लग्नामध्ये विशेष महत्व असते.

नुकत्याच एका प्रकरणात या संदर्भात अलाहाबाद हायकोर्टाने सुनावणी केली आहे. ही सुनावणी करताना सात फेरे आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह हे वैध नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये स्मृती सिंह यांनी एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये एका पतीने घटस्फोट न घेता आपल्या पत्नीने पुनर्विवाह केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, तिला शिक्षा झाली पाहिजे असे त्याने म्हटले होते. अलाहाबाद न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची प्रक्रिया आता रद्द केली आहे.

विवाहासाठी सप्तपदी आवश्यक

या याचिकेला परवानगी देताना न्यायमूर्ती संजय कुमार सिंह म्हणाले की, “विवाहासंदर्भातील 'विधी' या शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने विवाह समारंभ आणि योग्य पद्धतीने विवाह सोहळा करणे असा ठरलेला नियम आहे. जोपर्यंत विवाह व्यवस्थित रित्या पार पडत नाही तोपर्यंत तो विवाह सोहळा मानला जात नाही.

पुढे न्यायालयाने म्हटले आहे की, “पक्षकारांना लागू असलेल्या कायद्यानुसार जर हा विवाह वैध नसेल तर कायद्याच्या दृष्टीने तो विवाह नाही. 'सप्तपदी' समारंभ हा हिंदू कायद्यानुसार वैध विवाहासाठी आवश्यक घटकांपैकी असलेला एक घटक आहे. परंतु, सध्याच्या प्रकरणात या पुराव्याचा अभाव आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 7 चा दाखला दिला आहे. या कलमानुसार, हिंदू विवाह सोहळा हा संपूर्ण विधींसह केला पाहिजे. ज्यामध्ये सप्तपदी (विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांनी अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेणे) विवाह सोहळा पूर्ण करते. या सात फेऱ्यांमुळे लग्न बंधनकारक होते.

नेमक प्रकरण काय ?

स्मृती सिंह यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये स्मृती सिंह यांचे लग्न सत्यम सिंह यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर त्यांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव आला. या कटुतेमुळे स्मृती यांनी सासरचे घर सोडले.

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करत स्मृती यांनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी पती सत्यम आणि सासरच्या लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर, पती सत्यमने स्मृतीवर दुसरे लग्न केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT