Amar Jawan Jyoti - Rahul Gandhi Team eSakal
देश

"आम्ही अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू, काहींना बलिदानाचा अर्थ समजत नाही"

अमर जवान ज्योत दुसरीकडे नेण्यावरून राहुल गांधींची केंद्रावर टीका.

सकाळ डिजिटल टीम

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेटवर गेल्या 50 वर्षांपासून धगधगत असलेली 'अमर जवान ज्योती' (Amar Jawan Jyoti) राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. त्यानिमित्ताने आता शुक्रवारी पार पडणाऱ्या कार्यक्रमात अग्नीला नवीन ठिकाणी नेण्यात येणार असून, इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती यानंतर जळताना दिसणार नाही. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी (republic day) लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधानांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकारत विलीन करण्यात येईल. राहुल गांधींनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'आपल्या वीर जवानांसाठी जी अमर जवान ज्योती तेवत होती, तिला आज विझवण्यात येईल, हे अत्यंत दुखद आहे. काही लोकांना देशप्रेम आणि बलिदानाचा अर्थ समजत नाही. मात्र आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योति पुन्हा एकदा पेटवू असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सर्व सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक आहे, जिथे रायफल आणि सैनिकांचे हेल्मेट संगमरवरी लावलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT