देश

अमरनाथ यात्रेच्या नावनोंदणीला सुरुवात; २८ जूनपासून घुमणार 'हर हर महादेव'चा आवाज

सकाळन्यूजनेटवर्क

Amarnath Yatra 2021 : पवित्र अमरनाथ यात्रेला यंदा २८ जून २०२१ पासून सुरुवात होणार आहे. सुमारे सहा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून होणारी यात्रा आषाढ चतुर्थीला सुरु होवून २२ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षा बंधनाच्या दिवशी संपेल. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गतवर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. 

अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्राची अट ठेवण्यात आली आहे. १३ वर्षांखालील बालके, ७५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६ महिन्यांपेक्षा जास्त गरोदर असणार्‍या महिलांना यासाठीनोंदणी करता येणार नाही. shriamarnathjishrine.com/. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करु शकता. जम्मूमध्ये भाविकांना राहण्यासाठी बेस कॅम्प तयार केले जातात. 

गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडे लाखात)
२०२० - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित 
२०१९- ३.५० 
२०१८ - २.८५ 
२०१७- २.६० 
२०१६ - २.२० (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्याननंतर परिस्थिती खराब झाली होती) 
२०१५- ३.५२ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT