amarnath
amarnath esakal
देश

अमरनाथ यात्रेसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, यात्रेकरूंना 5 लाखांचं विमा कवच

सकाळ डिजिटल टीम

अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे.

यंदाची अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे. या यात्रेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केला आहे. त्यामुळे यात्रेकरुंनी समाधान व्यक्त झाले आहे.

प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात RFID टॅग दिले जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेबाबत घडामोडींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यापैकी दोन बैठका या यात्रेची सुरक्षा आणि त्यासंदर्भातल्या व्यवस्थेबाबत होत्या तर तिसरी बैठक ही जम्मू-काश्मीरमधील सर्वसाधारण सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. दरम्यान, कोरोना निर्बंधांमुळे गेले दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. या प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी एप्रिलपासून सुरू झाली आहे. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्याची घोषणा करताना श्राइन बोर्डाने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या हालचालीसाठी RFID आधारित ट्रॅकिंग केले जाईल. तसेच प्रवासासाठी निवास क्षमता, आरोग्य सुविधा, दूरसंचार सुविधा, हेली सेवा, SASB अॅप, पोनीवालांसाठी वर्षभराचा विमा यासह प्रवासी आणि सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी या वर्षी अनेक अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

अमरनाथजी श्राइन बोर्डाने अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्यांना वगळून दैनंदिन मार्गानुसार यात्रेकरूंची संख्या 10,000 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाने प्रवाशांसाठी 2.75 किमी लांबीच्या बालटाल ते डोमेलपर्यंत मोफत बॅटरी कार सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT