देश

काश्‍मिरात व्यापाऱ्यांचे मरण; आठवडाभरात 1 हजार कोटींचा फटका 

वृत्तसंस्था

श्रीनगरः जम्मू व काश्‍मीरमधील "कलम 370' रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला आहे. या आठवडाभरात व्यापाऱ्यांचे सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याने या परिस्थितीत इतक्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

काश्‍मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (केसीसीआय) सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यापाऱ्यांना प्रतिदिन सरासरी 175 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. येथील बेकरी व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याबरोबर मेंढपाळ, जनावरांची विकी करणारे दलाल, कापड विक्रेते व इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही याची झळ बसत असल्याची माहिती या सदस्याने दिली. 

व्यापाराची स्थिती 
1000 कोटी- आठवडाभरातील नुकसान 

175 कोटी -प्रतिदिनी होणारे सरासरी नुकसान 

200 कोटी - बेकरी व्यवसायिकांचे नुकसान

तणावामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ईद साजरी होणार नसल्याचे संकेत आहेत. ईदनिमित्त नवीन कपड्यांच्या खरेदीला प्राधान्य असते. मात्र, या वेळी नागरिकांची तशी मनःस्थिती नाही. - मोहंमद यासिन, कापड विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT