Amit Shah 
देश

Loksabha 2019 : दहशतवाद्याच्या मृत्यूचे सोनियांना दु:ख : शहा 

पीटीआय

कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
 
येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून दिलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. प्रज्ञासिंह यांच्याविरुद्धचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. बाटला हाउस चकमक यूपीए सरकारच्या काळात झाली. या चकमकीत दहशतवादी मारल्यानंतर सोनिया गांधी यांना दु:ख झाले. मात्र, याच चकमकीत हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांबद्दल त्यांना काहीही वाटले नाही. कॉंग्रेसने या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला हवे.

शहा म्हणाले की, बांगलादेशातून जे हिंदू, बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्‍चन कोणत्याही धर्माचे निर्वासित असोत; त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल आणि तसा उल्लेख जाहीरनाम्यात आहे. यासंदर्भात नागरी संशोधन विधेयक अधिवेशनात आणले जाईल आणि त्यानुसार परदेशातील स्थलांतरितांना नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यानंतर एनआरसी आणले जाईल. निर्वासितांनी काळजी करण्याची गरज नाही. केवळ घुसखोरांनी घ्यायला हवी. एनआरसी केवळ बंगालसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये केवळ भाजपच सरस्वतीपूजा आणि दुर्गापूजेचे आयोजन सन्मानाने करू शकतो, असेही शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : बदलापुरातील 100 टक्के क्षयरोग रूग्णांना घेतलं दत्तक

SCROLL FOR NEXT