देश

पाकव्याप्त काश्मीरवर आजही भारताचा हक्क- अमित शहा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच अमित शहांनी लोकसभेत बोलताना पाकव्याप्त काश्मीवरही भारताचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरु असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाली असल्याचीही टीका केली. पाकिस्तानने  कलम 370चा वापर करत काश्मीर धुमसत ठेवलं असं सांगत त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच कलम 370 अर्थव्यवस्थेला मारक असल्याचंही लवकरच सिद्ध करु असेही अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, देशहितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात आणि हा कलम 370 रद्द करणे हे देशहिताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे होते तेच आम्ही करत आहोत. समाजविघातक शक्तींना देशात कधीच पुढे येऊ देणार नसल्याचेदेखिल त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, कलम 303 आजही संविधानाचा अविभाज्य घटक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT