Anita Bose
Anita Bose esakal
देश

'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध नव्हते. गांधींना वाटायचे की ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. दुसरीकडे माझे वडील गांधींचे मोठे प्रशंसक होते, असे अनिता बोस फॅफ (Anita Bose Pfaff) म्हणाल्या. अनिता बोस या सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या कन्या आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि जवाहरलाल नेहरु ब्रिटिशांना हवाली करण्यास तयार होते. असे वादग्रस्त विधान केले आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बुधवारी (ता.१७) बोलताना अनिता बोस यांनी कंगना राणावतच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. अनिता बोस म्हणतात, की दोघे (नेताजी आणि गांधी) हिरो होते, जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. एकमेकांशिवाय ते शक्य नव्हते.

फक्त अहिंसेने भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काही काँग्रेस सदस्य बऱ्याच काळापासून दावा करत होते, त्या प्रमाणे हे नाही. आम्हाला सर्वांना माहीत होते की नेताजी आणि आयएनए (भारतीय राष्ट्रीय सैन्य) यांच्या कृतीचेही योगदान भारताच्या स्वातंत्र्यात आहे. फक्त नेताजी आणि आयएनए यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा अर्थहीन आहे. गांधींनी अनेकांना प्रेरित केले. त्यात नेताजीही असल्याचे त्या म्हणाल्या. लाखो लोकांना भारताच्या स्वातंत्र्याला योगदान दिले असल्याचे बोस यांनी सांगितले. मंगळवारी (ता.१६) कंगना राणावतने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधी यांनी पाठिंबा दिला नाही. गांधींच्या अहिंसा तत्त्वाची कंगनाने थट्टा केली होती. स्वातंत्र्याबाबत फक्त एकाच बाजूने चर्चा करणे भाबडेपणा ठरेल, असे अनिता बोस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT