Army Recruitment Sakal
देश

Army job recruitment:संतुलन साधण्यासाठी लष्कर भरतीत बदल

कर्नल सुरेश ; तंदुरुस्तीसह हुशारीचाही समावेश लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल. मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर- हुशारीबरोबरच ताकदीचे योग्य संतुलन साधण्याच्या हेतूने लष्कराने आपल्या भरतीच्या नियमांत बदल केला आहे,

अशी माहिती लष्कराचे भरती अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी दिली. यापूर्वी लष्करात भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र, आता भरतीच्या पहिल्या टप्प्यातच लेखी परीक्षा घेतली जाईल.

भरतीप्रक्रियेतून निवडले जाणार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील, यावर भर असेल, असेही कर्नल जी.

सुरेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

कर्नल सुरेश पुढे म्हणाले, की लष्कराच्या भरती प्रक्रियेत करण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल.

मात्र, त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील. अग्निवीरांच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, या महिन्यात त्याची अधिसूचनाही जारी केली आहे,

असेही त्यांनी सांगितले. लष्कराच्या बदललेल्या भरती प्रक्रियेनुसार, प्रत्यक्ष भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात लष्कराने वृत्तपत्रांतही जाहिराती दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT