मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर रस्त्यांवरील वाहतूकही धीम्या गतीने सुरू आहे. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सांताक्रूझ परिसरात बोरिवलीहून वांद्र्याच्या दिशेनं येणार्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.