Arundhati Roy speaks controversial statement against Indian Army and Pakistan Army
Arundhati Roy speaks controversial statement against Indian Army and Pakistan Army 
देश

पाक कधी आपल्या लष्कराचा वापर जनतेविरुद्ध करत नाही : अरुंधती रॉय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 'भारतातील काही राज्यांमध्ये कायम नागरिकांविरोधात लष्कर उभे केले जाते. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर केला जातो. पण पाकिस्तानी सैन्य कधीच आपल्या नागरिकांविरोधात तैनात करण्यात येत नाही,' असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अरूधंती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला. यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर खूप टीका होत आहे.

'1947 पासूनच भारतातील काही राज्यांत नेहमीच नागरिकांविरोधात सैन्य तैनात करण्यात आले आहे. काश्मीर, मिझोराम, मणिपूर, नागालँड, पंजाब, गोवा येथील नागरिकांनी बंड केल्यास सरकारने लगेच लष्कराचा वापर करत दबाव आणला. पण पाकिस्तानसारख्या देशात असे कधी झाले नाही, पण हिंदू देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही देशात मात्र असे घडते असे वादग्रस्त उद्गार रॉय यांनी काढले आहेत. 

काश्मीरातील 370 कलम हटविल्यापासून अनेक जण त्या विरोधात बोलताना दिसतात. मोदी सरकारचा हा चुकीचा निर्णय असल्याचे काहींचे मत आहे. अशातच रॉय यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काश्मीरमधील परिस्थितीची चर्चा होत आहे. पण पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रॉय यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय. तसेच ट्विटरवर #ArundhatiRoy हा हॅशटॅग ट्रेंडिंग असून त्यावरून रॉय यांना खडे बोल सुनावले जात आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT