Asaduddin Owaisi Team eSakal
देश

लखीमपूर: "आशिष ऐवजी आतिक असता तर..."; ओवैसींचा हल्लाबोल

असदुद्दीन ओवैसी यांनी यावरुन योगी सरकारवर टीका केली आहे.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेवरुन सध्या देशभरात राजकारण पेटलंय. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आपल्या वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वाराणसीमध्ये झालेल्या किसान न्याय सभेतून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यातच एमआएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृहाराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यामुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ओवैसी यांनी याच प्रकरणावरु केंद्र सरकारला धारेवर धरत त्या ठिकाणी आशिष ऐवजी आतिक असता तर त्यांच्या घरावर बुलडोझर चालवलं असतं असा आरोप केला. अजय मिश्रा हे उच्चवर्णीय असून, आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता भाजपला उच्चवर्णीयांची मतं गमवायची नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

अजय मिश्रा हे शेतकऱ्यांना सरळ करण्याची भाषा वापरतात, त्याच्या दोन दिवसांनंतर लखीमपूरची घटना घडली, या घटनेत ज्या गाडीखाली शेतकरी चिरडले गेले ती गाडी त्यांचीच आहे, मग नरेंद्र मोदी अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून का काढत नाहीत असा प्रश्नही ओवैसी यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT