नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपला (एनडीए) धक्का बसला आहे. आसाम गण परिषद (एजीपी) राज्यात भाजपापासून वेगळी झाली आहे. एजीपी आसाममधील भाजपा सरकारमध्ये सहकारी पक्ष असून त्यांचे 14 आमदार आहेत.
राज्यात जर नागरिकत्व विधेयक संमत झाले नाही तर पुढील पाच वर्षांत राज्यात हिंदू अल्पसंख्यक ठरतील असे, आसामचे मंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी म्हटले आहे. विधेयक संमत झाले नाही तर आसामचा दुसरा काश्मीर करणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकत्व अधिनियम, 1955 हे दुरूस्तीसाठी लोकसभेत सादर केले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून अल्पसंख्यक समाजातील लोकांना भारतात 12 वर्षांऐवजी 6 वर्षे वास्तव केल्यानंतरच नागरिकत्व प्रदान करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, एजीपीचा एकही खासदार नाही. एजीपीने केंद्र सरकारकडून आणण्यात येणाऱ्या नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला विरोध केला आहे. नागरिकत्व (संशोधन) विधेयक 2016 संसदेत संमत झाले तर आपण राज्यातील आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडू असा इशारा एजीपीने आधीच दिला होता. एजीपीने पाठिंबा काढला असला तरी राज्यातील सर्वानंद सोनोवाल सरकारला कोणताच धोका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.