crime News 
देश

Accident News : रोडच्या कडेला असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले; चार जण ठार

सकाळ डिजिटल टीम

लखीमपुर खीरी : शहरातील कोतवाली परिसरातील पांगी गावाजवळ खिरी-बहराइच महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News in Marathi )

या दुर्घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. खीरीचे पोलिस अधीक्षक गणेश प्रसाद साहा यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली.

या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साहा म्हणाले की, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT