Atishi Marlena sakal
देश

Atishi Marlena : हरियाना सरकारने पाणी रोखले,आप;आतिशी यांचे उपोषण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच

‘‘हरियानातील हथनीकुंड धरणातून येणाऱ्या पाण्याचे दरवाजे हरियाना सरकारने बंद केल्याने दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे’’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘हरियानातील हथनीकुंड धरणातून येणाऱ्या पाण्याचे दरवाजे हरियाना सरकारने बंद केल्याने दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे’’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे. हे पाणी मिळावे यासाठी त्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

दिल्लीतील पाणी टंचाईसाठी दिल्ली सरकारने हरियाना सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपने दिल्ली सरकारच्या अकार्यक्षमतेवर आरोप केले आहेत. दि यासंदर्भात दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांची भेट घेतली. आतिशी मार्लेना यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांचे वजन कमी झाले असून शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हरियाना सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचा आरोप केला जात आहे. हरियाना सरकारतर्फे १०० लक्ष गॅलन पाणी कमी सोडले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दिल्लीतील २८ लाख लोकांना पाणी कमी मिळत असल्याचा आरोप होत आहे. ‘‘हथनीकुंड धरणात पाणी असूनही दिल्लीतील रहिवाशांसाठी हरियाना सरकार पाणी का सोडत नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हातात पुजेची टोपली अन् मदतीसाठी महिलांच्या किंचाळ्या...वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीचा थरारक VIDEO समोर

School Students Assault: भयंकर! इंग्लिश मीडियम स्कूलमधील २२ विद्यार्थ्यांवर अत्याचार, मुख्याध्यापकासह तिघांना अटक

MNS-MVA Morcha: लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली, शरद पवारांचे आवाहन

Mutual Fund : गेल्या 5 वर्षांत 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप लार्ज-कॅप म्युच्युअल फंड; पहा किती रिटर्न दिला!

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

SCROLL FOR NEXT