Atishi Marlena sakal
देश

Atishi Marlena : हरियाना सरकारने पाणी रोखले,आप;आतिशी यांचे उपोषण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच

‘‘हरियानातील हथनीकुंड धरणातून येणाऱ्या पाण्याचे दरवाजे हरियाना सरकारने बंद केल्याने दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे’’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘हरियानातील हथनीकुंड धरणातून येणाऱ्या पाण्याचे दरवाजे हरियाना सरकारने बंद केल्याने दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे’’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे. हे पाणी मिळावे यासाठी त्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

दिल्लीतील पाणी टंचाईसाठी दिल्ली सरकारने हरियाना सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपने दिल्ली सरकारच्या अकार्यक्षमतेवर आरोप केले आहेत. दि यासंदर्भात दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांची भेट घेतली. आतिशी मार्लेना यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांचे वजन कमी झाले असून शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हरियाना सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचा आरोप केला जात आहे. हरियाना सरकारतर्फे १०० लक्ष गॅलन पाणी कमी सोडले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दिल्लीतील २८ लाख लोकांना पाणी कमी मिळत असल्याचा आरोप होत आहे. ‘‘हथनीकुंड धरणात पाणी असूनही दिल्लीतील रहिवाशांसाठी हरियाना सरकार पाणी का सोडत नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT