Ayodhya Ram Mandir Esakal
देश

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या निमंत्रणावरून राजकारण पेटलं; ठाकरे गटाला डावललं तर राज ठाकरेंना आमंत्रण

पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातून या सोहळ्यासाठी जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. याच मुद्यावरून ठाकरे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय पातळीवरही अनेक विरोधी पक्षांनी निमंत्रण मिळूनही या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले होते पण पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत या सोहळ्याला आमचे प्रतिनिधी जाणार नसल्याचे म्हटले आहे.

करात म्हणाल्या, ‘‘आम्ही या सोहळ्याला जाणार नाहीत, विविध धार्मिक श्रद्धांचा आम्ही आदरच करतो पण ते धर्माचे राजकारण करत आहेत. स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी धर्माचा वापर करणे हे योग्य नाही.’’ करात यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्वांना निमंत्रण पाठविले आहे पण ज्यांना रामाचे बोलावणे आले आहे तेच या सोहळ्याला येतील.’’ दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आम्ही या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

माझ्या हृदयात राम: सिब्बल

काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी राम माझ्या हृदयात असल्याने या सोहळ्याला जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही, असे नमूद केले. लोकसभेतील विरोधीपक्ष नेते अधीररंजन चौधरी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले असून राहुल गांधी यांना अद्याप निमंत्रण मिळाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कटियार यांना निमंत्रण नाही

राममंदिर आंदोलनातील मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनय कटियार यांनाही अद्याप या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले नसल्याचे कळते. उमा भारती मात्र १८ जानेवारी रोजीच अयोध्येत दाखल होणार आहेत. कटियार हे अयोध्येमध्ये राहतात पण त्यांनाच अद्याप हे निमंत्रण का पाठविण्यात आले नसावे? यावरून चर्चा रंगली आहे.

भाजप घडवून आणणार रामदर्शन

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर भाजपने लाखो लोकांना दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघांतील अडीच कोटी लोकांना रामाचे दर्शन घडवून आणण्यात येईल. याची जबाबदारी भाजपचे स्थानिक खासदार आणि आमदारांकडे सोपविण्यात आली आहे. अयोध्येतील भ्रमंतीनंतर हे नागरिक आपापल्या घरी परततील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT