जल्लोष करत बळिराजाचा ‘फतेह मार्च’ sakal
देश

जल्लोष करत बळिराजाचा ‘फतेह मार्च’

शेतकऱ्यांनी धरला घरचा रस्ता; दिल्लीच्या सीमांनी घेतला मोकळा श्वास

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमांवर गेल्या वर्षभराहून अधिककाळ चाललेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता केल्यावर देशभरातील अन्नदात्या बळिराजाने आजपासून आपापल्या घरी परतण्यास सुरवात केली आहे.

सिंघू, टिकरी व गाझीपूर सीमांवर आज ‘विजय फेरी’ (फतेह मार्च) काढण्यात आली. अनेक शेतकरी भजने, गुरुवाणी गायनात दंग झाले होते. अनेक जण ट्रॅक्टरवर भांगडा करण्यात रंगले होते. काही शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरील माती ‘अहंकारावरील विजयाची आठवण’ म्हणून आपापल्या घरी नेली. दरम्यान पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करायचा की नाही याचा अंतिम निर्णय झालेला नाही असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. आगामी ४-५ दिवसांत याबाबतचा निर्णय शेतकरी संघर्ष कृती समिती घेईल असेही टिकैत यांनी सांगितले.केंद्राने संयुक्त किसान मोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनांच्या पूर्ततेवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि यात जराशीही ढील होऊ देणार नाही असेही टिकैत म्हणाले.

अडथळे काढायला सुरूवात

दिल्लीतील तिन्ही सीमांवर आता सामानाच्या आवराआवरीची लगबग सुरू झाली आहे. अनेक पक्के तंबू सीमांवरून हटविण्यात आले आहेत. सारे शेतकरी माघारी जाण्यास व सीमांवरील रस्ते पूर्णतः खुले होण्यास ४ ते ५ दिवस लागतील असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी रस्ते मोकळे करून दिले असून पोलिसांनीही लोखंडी तसेच सिमेंटचे अडथळे व काटेरी कुंपणे बाजूला करण्यास सुरवात केली आहे.

"आमच्यासाठी हा अविस्मरणीय सत्याग्रह होता. आम्ही असू किंवा नसू पण सत्तेला आणि गुर्मीला धडा शिकवून, अहिंसात्मक मार्गाने शेतकऱ्यांना मिळालेल्या या विजयाची आठवण शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या कायम स्मरणात ठेवतील."

- मनजिंदरसिंग, पंजाबमधील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaparinirvan Din: महासूर्याच्या चितेला साक्षी ठेवून अनुयायांची धम्मदीक्षा; आंबेडकरांनी १६ डिसेंबर १९५६ ला मुंबईत कोणता संकल्प केला?

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाणदिनानिम्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान? योगींनी शेअर केला खास video

Indigo Flight रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतील का? विमान कंपन्यांचे नियम काय सांगतात?

NZ vs WI 1st Test : भले शाब्बास... Justin Greaves च्या द्विशतकाने विंडीजला वाचवले, विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडला रडवले

'बोलविता धनी': हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

SCROLL FOR NEXT