

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
गोंदिया ( लाखांदूर) शासनाच्या 'जल जीवन मिशन' अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यातील भागडी गावाला गेल्या वर्षभरापासून गाळयुक्त दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील तब्बल ९६० कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
'हर घर नल, हर घर जल' योजनेअंतर्गत भागडी गावात विहीर, बोरवेल, पाणी शुद्धीकरण केंद्र आणि पाइपलाइनसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात नदीतील गाळयुक्त दुषित पाणी थेट विहिरीत जाते. पाणी शुद्धीकरण केंद्र कुचकामी ठरल्याने आणि पाइपलाइन लिकेज असल्याने हेच अशुद्ध पाणी टाकीत जमा होऊन थेट नागरिकांच्या घरात पोहोचत आहे.