कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील करंजाळे येथे २५ जुलै रोजी रस्ता खचल्याने गेल्या नऊ दिवसांपासून घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार असून सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.