'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू  
देश

'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था

रामगड (झारखंड) : 'बीफ' बाळगल्याच्या आरोपावरून रामगड जिल्ह्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आरके मलिक यांनी हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली देशभर होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणले, 'देशामधील कोणत्याही नागरिकास कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. लोकांचे जीव घेणे म्हणजे गोरक्षा नव्हे.' मात्र असा भावनिक आवाहनानंतर काही तासातच रामगडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अलिमुद्दिन ऊर्फ असगर अन्सारी हे आपल्या मारूती व्हॅनने प्रवास करत होते. दरम्यान बजारतंद येथे बंदी असलेले मांस बाळगल्याचा आरोप करत त्यांना जमावाने रोखले. मोटारीतून बाहेर काढून 30-40 जणांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांना जमावातून सोडवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बाबत माहिती देताना अतिरिक्त पोलिस महासंचालक आरके मलिक म्हणाले, 'असगरवर बालकांचे अपहरण आणि हत्येचा आरोप होता. बीफच्या व्यवसायामध्ये असलेल्या काही जणांनी मिळून त्यांना ठार करण्याचा कट रचला. हल्लेखोरांची ओळख पटली आहे.'

मागील तीन दिवसात झारखंडमध्ये अशा प्रकारच्या हत्येचा हा तिसरा प्रकार समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : नाशिकच्या सुरगाणामध्ये पुन्हा भुकंपाचे धक्के

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT