देश

कर्नाटकात सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती परिवहन मंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी दिली. बुधवारी (ता.२०) पत्रकारांशी बोलताना सध्या बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री तम्मण्णा म्हणाले, ‘राज्यातील सर्व १९.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे खात्यावर ६२० कोटी रुपयाचा भार पडणार आहे. त्यापैकी २५ टक्के भार परिवहन खाते उचलणार असून बाकीची रक्कम शिक्षण खाते किंवा सरकारने भरावयाची आहे.’

बस तिकीट दरवाढीसंबंधात ते म्हणाले, ‘डिझेलच्या दरात वाढ झाली असली तरी बस तिकीट दरात सध्या वाढ करण्यात येणार नाही. खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे. राज्यातील सर्व परिवहन विभागाकडून १५ टक्के तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. दरवाढ न केल्यास परिवहन संस्थेला ५०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. तरीही तिकीट दरात वाढ करण्यात येणार नाही.’

पार्किंग जागा असेल तरच कार नोंदणी 
स्वत:ची जागा असेल तरच नवीन कारची नोंदणी करण्याचा नवा नियम तयार करण्यावर विचार सुरू असल्याचे सांगून मंत्री तम्मण्णा म्हणाले, बंगळूरसह इतर शहरातील पार्किंग व वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी नवा नियम करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT