ANI
ANI
देश

Bharat Bandh : दहा वर्षे आंदोलनाची तयारी - राकेश टिकैत

सकाळ डिजिटल टीम

राकेश टिकैत म्हणाले की, कृषी मंत्री म्हणतात की चर्चेसाठी या. मात्र आम्ही कृषीमंत्र्यांना सांगतो की सरकार आम्हाला वेळ आणि जागा सांगू दे.

भारत बंदमुळे दिल्लीत महामार्गावर ट्राफिक जॅम झाले असून आंदोलक रेल्वे ट्रॅकवर असल्यानं रेल्वे सेवासुद्धा विस्कळीत झाली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी कृषी कायद्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, दहा वर्षे लागली तरी चालतील पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, कृषी मंत्री म्हणतात की चर्चेसाठी या. मात्र आम्ही कृषीमंत्र्यांना सांगतो की सरकार आम्हाला वेळ आणि जागा सांगू दे. फक्त चर्चेबद्दल बोलतात पण त्यासाठी प्रत्यक्षात यावं. सरकारने चर्चेसाठी कोणत्याही अटींशिवाय बोलवावं. दहा वर्षे लागली तरी चालतील आम्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून जाणार नाही.

भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर रास्ता रोको केला आहे. दिल्ली उत्तर प्रदेश यांच्यातील गाझीपूर सीमेवरही रास्ता रोको केला आहे. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी ट्राफीकसाठी अॅडवायजरी जारी केली आहे. दिल्लीतही भारत बंदमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. २० ठिकाणी रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. जवळपास २५ रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये आम्ही काही सील केलेलं नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे. बंदच्या काळात अॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स यांच्यासह अत्यावश्यक काम असलेल्यांना सोडण्यात येईल. दुकानदारांना आम्ही आवाहन केलं आहे की त्यांनी चार वाजेपर्यंत सर्व बंद ठेवावं. त्यानंतर दुकाने उघडावीत. इथं बाहेरून कोणीही शेतकरी आलेले नाहीत असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT