Rahul Gandhi vs Modi Government esakal
देश

Rahul Gandhi : चीन-पाकिस्तान एकत्र येऊन युद्ध केल्यास भारताचं मोठं नुकसान; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

'लष्कराबद्दल आम्हाला फक्त आदरच नाही, तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीही आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'लष्कराबद्दल आम्हाला फक्त आदरच नाही, तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीही आहे.'

Bharat Jodo Yatra News : 9 डिसेंबरला भारत-चीन सैनिकांमध्ये (India-China Soldiers) मोठी चकमक झाली होती. यामध्ये दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर विरोधक केंद्र सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही रविवारी पुन्हा एकदा केंद्रावर जोरदार टीका केलीये.

राहुल गांधी म्हणाले, चीन आणि पाकिस्तान (Pakistan) एकत्र तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत युद्ध झालं तर ते दोन्ही देशांच्या विरोधात असेल. यात आपल्या देशाला (भारताला) मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) एका यूट्यूब चॅनलशी बोलताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय.

ते पुढं म्हणाले, चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. जर युद्ध होणार असेल तर ते दोघांमध्ये होईल. अशा परिस्थितीत भारताचं मोठं नुकसान होईल. भारत आता खूपच कमकुवत आहे. मात्र, लष्कराबद्दल आम्हाला फक्त आदरच नाही, तर त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीही आहे. लष्कराशिवाय या देशाची कल्पनाही करता येणार नाही, असं गांधींनी स्पष्ट केलं.

पूर्वी आमचे दोन शत्रू चीन आणि पाकिस्तान होते. त्यांना वेगळं ठेवण्याचं आमचं धोरण होतं. पण, आता आमची लढाई पाकिस्तान, चीन आणि दहशतवादाशी सुरू आहे. या तिघांनी मिळून आज मोर्चेबांधणी केलीये. अशा स्थितीत युद्ध झालं तर ते दोघांमध्येही होईल. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही एकत्र काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT