Accident in Bihar  Esakal
देश

Accident: बिहारच्या वैशालीमध्ये मोठा अपघात, ट्रकने 30 जणांना चिरडलं, 12 जणांचा मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला

सकाळ डिजिटल टीम

बिहार राज्यातील वैशाली येथे काल (रविवारी) रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये लहान मुले आणि महिलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेले आणि जखमी झालेले लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात एक ट्रक 120 च्या वेगाने आला आणि लोकांना चिरडून निघून गेला.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.

दरम्यान अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेत आठ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT