Accident News Esakal
देश

Accident News: वीटभट्टीची चिमणी पेटली, मिठाई वाटली अन्... ९ मजूरांचा जागीच मृत्यू

बिहारमधील मोतिहारी येथे चिमणी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील मोतिहारी येथे चिमणी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही दाट शक्यता आहे. खरं तर, रामगढवा पोलीस स्टेशन हद्दीतील चंपापूर नरीरगीर चौकात एका वीटभट्टीला आग लागल्यानंतर त्याच्या चिमणीत मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर ती खाली पडली. चिमणीत खाली खचल्यामुळे गेल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रक्सौल येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर तेथे गाडलेल्या लोकांच्या शोधात ढिगाऱ्यासमोर लोकांचा जमाव जमला. कोणाचा तरी जीव वाचेल या आशेने लोक ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेबाबत सांगण्यात येत आहे की, पहिली चिमणी फुंकण्याचा सोहळा पार पडल्यानंतर कामगारांनी चिमणीला आग लावून जल्लोष केला आणि धूर वर पोहोचला त्यानंतर मिठाई वाटली जात होती.

यादरम्यान चिमणीचा ऑपरेटरही धूर निघताना पाहत उभा होता. दरम्यान, चिमणीत मोठा स्फोट झाला आणि ऑपरेटरसह 9 जणांचा ढिगाऱ्याखाली दाबलं गेल्यामुळे जीव गेला. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर रात्री धुक्यामुळे बचावकार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे सकाळपासून पुन्हा बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं. सर्व मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT