adhir ranjan chaudhri 
देश

लाल किल्ल्यावर सरकारनेच आपली माणसं पाठवून हिंसा केली; काँग्रेसचा आरोप

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसने प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेमागे केंद्र सरकारचाच कट असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या वेषात आपल्याच लोकांना लाल किल्ल्यावर पाठवून हिंसा घडवून आणली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी हिंसेच्या घटनेवर संयुक्त संसदीय समितीकडून तपास करण्याची मागणी केली. त्यांनी लाल किल्ल्याच्या घटनेचा उल्लेख करत म्हटलं की, वास्तव तर असं आहे की आपल्याला असं वाटतंच होतं की, असं काही घडावं जेणेकरुन लोकांचे लक्ष भटकवलं जाऊ शकेल. ही आपली विचारपूर्वक केलेली खेळी आहे. तुम्ही आपल्याच लोकांना शेतकऱ्यांच्या वेषात तिथं पाठवलं. जर याचा तपास झाला तर याच्या मागे सरकारच आहे हे बाहेर येईल. 

हिंसेचा तपास करण्याची मागणी
त्यांनी विचारलं की, अमित शहांसारखा ताकदवान गृहमंत्री असताना काही लोक लाल किल्ल्यावर पोहोचलेच कसे? हाच मोठा प्रश्न आहे. याचा तपास होणार नाही का? प्रजासत्ताक दिनाला सर्वाधिक सुरक्षा राजधानी दिल्लीत असते. तर मग हे कसं घडलं? चौधरी यांनी पुढे सरकारवर शेतकऱ्यांच्या विरोधात छळाचा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप केला.  त्यांनी म्हटलं की, तुम्ही मोठ्या चतुराईने शेतकरी नेत्यांनार आरोप दाखल केलेत. आपण छळाने नव्हे तर बळाने शेतकऱ्यांना दाबू इच्छिता.
सरकारला एवढा अहंकार का?
त्यांनी प्रश्न केला की, संसदेपासून काही किलोमीटर अंतरावरच हजारो शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनासाठी बसले आहेत. 200  हून अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाहीये का? एवढा अहंकार कशासाठी? शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं की, आपण बहुमताचा बळाने वापर करणे थांबवा. शेतकऱ्यांविरोधातील ही लढाई थांबवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर; आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

PMC Standing Committee : स्थायी समितीचे सदस्य निवडताना भाजपकडून धक्कातंत्राचा वापर; १६ पैकी १३ नगरसेवक उपनगरांमधील

Horoscope: यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!

Valentine's Day Outfit Ideas For Men: नेहमी मुलीच का? मुलांनीही दिसा हटके; 'व्हॅलेंटाइन्स डे' निमित्त ट्राय करा 'हे' हँडसम लुक्स

Hasan Mushrif : 'राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार एकटेच चर्चा करायचे', भाजपच्या विश्वासाने विलीनीकरण होणार; हसन मुश्रीफांची माहिती

SCROLL FOR NEXT