rahul gandhi and JP nadda 
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींनी इतर देशांना भारतात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रणच दिले; नड्डा यांची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून टीका होत आहे. आता खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे.

ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना लोकशाहीत स्थान नाही,' असे त्यांनी 'नॅशनल युथ पार्लमेंट'च्या उद्घाटनानंतर व्हर्च्युअल भाषणात सांगितले. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांसारख्या परकीय शक्तींना चिथावणी देत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेस आज मानसिक दिवाळखोरीने ग्रस्त आहे.

राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतातील जनता त्यांचे ऐकत नाही, ते फक्त त्यांना त्रास देतात, अस नड्डा म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल लज्जास्पद वक्तव्य करून केवळ देशाचा अपमान केला नाही तर इतर देशांनाही आपल्या देशात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रण दिले आहे.

ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी संसदेत बोलण्याची परवानगी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

Mahabaleshwar Nachani Village : स्ट्रॉबेरी विसरा! महाबळेश्वरमधील 'या' गावाने ओळखच बदलली; आता थेट बनलेय 'नाचणीचे गाव', शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अन् खते मोफत

Solapur IT Park : सोलापूर आयटी पार्कच्या जागेबाबत मोठा ट्विस्ट! CM फडणवीसांच्या घोषणेनंतर प्लॅन बदलला? 'त्या' 50 एकर जागेचं काय होणार? सामंतांच्या विधानाने नवा पेच

Latest Marathi News Live Update : कुल्लू-मनालीकडे मोठ्या संख्येने पर्यटक जात असल्याने तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT