कोलकाता : राजकीय नेते नेहमीच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात. अशातच भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात वादग्रस्त वक्तव्य करताना आढळतात. पुन्हा एकदा भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिली घोष यांनी एक विचित्र विधान केले आहे. 'जे लोक गोमांस खातात, त्यांनी कुत्र्यांचे मांस खावे' असे वक्तव्य केले आहे.
कोलकात्याजवळ बर्दवानमध्ये अष्टमीच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना, घोष यांनी 'जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी कुत्र्याचे मांस खावे. ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असेल. रस्त्यावरच खायचे असेल तर कोणत्याही प्राण्याचे मांस चांगले असते.' असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. तुम्हाला कोणतेही मांस खाण्यापासून अडवलं आहे? जे खायचं आहे, ते घरी खा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'अनेक लेक घरात कुत्री पाळतात, त्यांचे मलमूत्र साफ करतात. मात्र गायीला मारणं हा खूप मोठा गुन्हा आहे. भारत हा श्रीकृष्णाचा देश आहे. अशा देशात गायींप्रती आदर असायलाच हवा. गायीचे दूध सर्वांसाठीच लाभदायक असते, ती आपली माता असते, तिला मारणे हे योग्य नाही. अनेक लोक विदेशी गायीही पाळतात. पण फक्त देशी गाय हीच आपली माता असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.