देश

‘लोजप’बाबत भाजपच निर्णय घेईल ; शपथविधी दिवाळीनंतर 

उज्वलकुमार

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय ‘एनडीए’च्या बैठकीत होईल आणि लोक जनशक्ती पक्षाबाबतही (लोजप) भाजप निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘लोजप’मुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागा बऱ्याच कमी झाल्याने नितीश यांची या पक्षाबाबत नाराजी आहे. तसेच, पक्षाला जागा कमी मिळाल्याने भाजपने आश्‍वस्त करूनही मुख्यमंत्रिपदाबाबत फेरविचार होऊ शकतो, असे सूतोवाच नितीशकुमार यांनी आज दिले. 

चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीत केवळ नितीशकुमार यांनाच लक्ष्य करत प्रचार केला. त्यामुळे भाजपला फायदा झाला तर त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या ‘जेडीयू’ला मात्र चांगलाच फटका बसला. नितीशकुमार हेच ‘एनडीए’तर्फे मुख्यमंत्री असतील, असे भाजपने निवडणुकीआधी आणि निकालानंतरही स्पष्ट केले आहे. मात्र, नितीश यांनी स्वत:हून भाजपकडे हे पद सोपवावे, अशीही कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज नितीशकुमार यांना विचारले असता, ज्यांनी मते खाल्ली त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते भाजपच ठरवेल, असे त्यांनी उत्तर दिले. तसेच, आज ‘एनडीए’च्या घटक पक्षांची अनौपचारिक बैठक होत असून त्यातच शपथविधीबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शपथविधी दिवाळीनंतर 
बिहारमध्ये दिवाळीनंतर नवीन सरकार स्थापन होईल, असे  सूत्राकडून सांगण्यात आले. एनडीएच्या सरकारमध्ये भाजप, जेडीयू, व्हिआयपी आणि हम पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत. सरकार स्थापनेबाबत पुढील रणनिती ठरवण्यासाठी जेडीयू आमदारांची काल बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्याला आलेल्या आमदारांशी चर्चा केली. यादरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत चर्चा केली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाआघाडीचीही बैठक 
माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीचीही बैठक झाली. या बैठकीत राजद, कॉंग्रेस, डावे पक्ष यांचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी व्हिआयपी, हम आणि एनडीएच्या विरोधात मत मिळवणाऱ्या अन्य पक्षांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काँग्रेसला घरचा आहेर 
कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी माजी खासदार तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे महाआघाडीचा पराभव झाला, असे म्हटले आहे. या पराभवाचे विश्‍लेषण व्हायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. बिहारमध्ये पक्षाला ७० जागा मिळालेल्या असताना योग्य उमेदवारांची निवड न होणे आणि प्रचारही प्रभावीपणे न होणे, या गोष्टी कॉंग्रेसच्या अपयशाला कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT