chidambaram 
देश

काश्मीरमध्ये मुस्लिमांच्या जागी हिंदू असते तर... : चिदंबरम

वृत्तसंस्था

चेन्नई : जम्मू काश्मीरमध्ये हिंदूची संख्या जास्त असती तर भाजप सरकारने कलम 370ला हात लावण्याचेही धाडस केले नसते. येथे मुस्लिमांची संख्या जास्त असल्यानेच कलम 370 हटविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चेन्नईत आयोजित एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर कलम 370 हटविण्यावरून आरोप केला. भाजपने आपली राजकीय ताकद लावून येथील कलम 370 हटविणअयाचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केले आहेत. काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

चिदंबरम म्हणाले, की काश्मीरमधील अशांततेबद्दल आंतरराष्ट्रीय माध्यमे वृत्त देत आहेत. पण, भारतीय माध्यमांना सरकारने घेरून ठेवले आहे. काश्मीर शांत असल्याचा भाजप दावा करत आहे. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे, यात काही शंकाच नाही. यात कोणाला शंका असेल तर ती भाजपला आहे. मुस्लिम बहुसंख्य असल्यानेच त्यांनी कलम 370 हटविले आहे. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नसले तरी, राज्यसभेत सात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना मदत करणे हे दुर्दैवी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

Uddhav Thackeray : दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा केला पाहणी दौरा

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT