bhanu pratap 
देश

कृषी कायदाविरोधातील आंदोलनाला काँग्रेसचा पैसा; शेतकरी नेत्याचा धक्कादायक आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकरी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायदा मागे घेण्याची मागणी करत आहेत. या दरम्यान, भारतीय किसान युनियन भानु गटाचे अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी एक धक्कादायक असा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, दिल्ली सीमेवर सुरु असलेलं आंदोलन हे काँग्रेसपुरस्कृत आहे. काँग्रेस या लोकांना आर्थिक मदत करत आहे. भानु गटाने 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनातून माघार घेतली आहे. 

भारतीय किसान युनियन बानु गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 26 जानेवारीला आम्हाला समजलं होतं की जितक्या संघटना सिंघु बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत आहेत त्या सर्वांना काँग्रेसनं खरेदी केलं आहे. काँग्रेसनं त्यांना इथं पाठवलं होतं. काँग्रेस या सर्वांना पैसा पुरवत होती. ज्यावेळी आम्हाला समजलं की, यांनी 26 जानेवारीला पोलिसांवर हल्ला केला, लाल किल्ल्यावर दुसरा झेंडा फडकावला त्याच दिवशी आम्ही संकल्प केला की यांच्यासोबत राहणार नाही. 

दिल्लीत 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भारतीय किसान युनियनमधून भानु गट बाहेर पडला. त्यांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. भानु प्रताप सिंह यांनी त्यावेळी म्हटलं होतं की, '26 जानेवारीला जे काही झालं ते खूपच दु:खद आहे. 26 जानेवारीच्या या घटनेनं मी दु:खी आहे. चिल्ला बॉर्डरवर सुरु असलेलं आंदोलन थांबवण्याची घोषणा करतो.' भानु गटासह राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेनंसुद्धा आंदोलनं मागे घेण्याची घोषणा केली होती. 

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्हीएम सिंह यांनी सांगितलं होतं की, मी अशा व्यक्तींसोबत विरोध करू शकत नाही ज्यांची दिशा वेगळी आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो मात्र व्हीएम सिंह आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटना मात्र आंदोलन मागे घेत आहे. मात्र भानु गटाने पहिल्यांधा सरकारसोबतच्या एका मिटिंगनंतर काही प्रमाणात आंदोलन मागे घेतलं होतं. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भानु प्रताप सिंह आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यात एक गुप्त मिटिंग झाली होती. त्यानंतर भानु गटाने चिल्ला बॉर्डरवरचं आंदोलनातून माघार घेतली होती. त्याठिकाणी थोडेच लोक आंदोलन करत होते. पुढे 26 जानेवारीला हिंसाचाराची घटना घडल्यानंतर भानु गटाने चिल्ला बॉर्डरवरचं आंदोलन संपवलं होतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT