देश

'चला, वाजवा थाळ्या', ब्लॅक फंगससाठीही मोदी लवकरच करतील घोषणा

विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधी यांनी कोरोनासहित वाढत्या ब्लॅक फंगस आजारावरुन देखील सरकारला धारेवर धरलं आहे. हा आजार पसरण्यामागे सरकारची अनास्था आणि अनागोंदी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरुन शालजोडीतून टोला देखील हाणला आहे.

केंद्राच्या अनास्थेमुळे पसरला कोरोना

राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळेच फक्त भारतातच कोरोनासोबतच ब्लॅक फंगसची महामारी वाढत आहे. लशीचा तुटवडा तर पहिल्यापासून आहेच, मात्र या नव्या महामारीवरील औषधाचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. या आजाराशी लढण्यासाठी देखील पंतप्रधान आता टाळ्या आणइ थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील, असं म्हणत त्यांनी हा टोला लगावला आहे.

कोरोना आणि देशातील विदारक परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच मोदी सरकारला घेरत असतात. याआधी काल शुक्रवारी देखील राहुल गांधी यांनी देशातील लसीकरणाच्या परिस्थितीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एक आकडा जाहीर केला होता, ज्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 च्या लोकसंख्येमागे 20 पेक्षाही कमी डोस प्राप्त झाले आहेत. हे आकडे सांगत राहुल गांधी यांनी लिहलं होतं की, मिस्टर मोदी, लोकांचं लसीकरण करा, उशीर नका करु!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT