CBSE Students file photo
देश

CBSE बारावीच्या परीक्षा रद्द; PM मोदींच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डचे अधिकारी तसेच काही केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

वृत्तसंस्था

केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डचे अधिकारी तसेच काही केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

नवी दिल्ली : CBSE १२ वी बोर्ड परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गुणांचे मूल्यमापन कसे करणार? याबाबत सीबीएसईने अद्याप माहिती दिली नाही, पण त्याच्या निकषांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. (CBSE Board Class XII examinations cancelled in meeting held by PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण वाढविणे योग्य ठरणार नाही.' याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बोर्डाच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी एम्समध्ये भरती करण्यात आले.

सर्व राज्यांचे पंतप्रधान मोदींच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षा रद्द होणार का याचीच चर्चा सुरू होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची बैठक बोलावली होती. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळही सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेणार याचीच वाट पाहात होते. सीबीएसईच्या निर्णयानंतर राज्य सरकार आता आपापल्या बोर्डाच्या १२वीच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यायला मोकळे झाले आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सीबीएसई बोर्डाचे अध्यक्ष, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) व ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (CISSA) यांच्या प्रस्तावित इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय आज जाहीर होणार होता. पूर्ण परीक्षाच रद्द करण्याऐवजी अर्ध्या किंवा दीड तासाची परीक्षा घ्यावी याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT