CDS Bipin Rawat  Sakal
देश

अखेरच्या भाषणात बिपीन रावतांनी दिला होता जैविक युध्दाचा इशारा!

सकाळ डिजिटल टीम

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आज झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ते, पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 अधिकारी आणि सहकारी ठार झाले. या अपघातातून हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमात्र बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या देशाला हदरवून सोडणाऱ्या अपघातानंतर सर्वत्र बिपीन रावत यांनी केलेल्या आजवरच्या कामाची चर्चा होत आहे, या दरम्यान त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात देशासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या होत्या. आपण त्यावर एक नजर टाकूयात.

बिपीन रावत यांनी बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (BIMSTEC) सदस्य देशाांच्या आपत्ती व्यवस्थापन सराव पॅनेक्स 21 च्या उद्घाटन प्रसंगी शेवटचे भाषण केले होते, BIMSTEC देशांनी ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश होतो, जैविक युद्धाविरुद्धापासून सावध राहण्याची इशारा दिला होता, येत्या काळात जैविक युध्द हा युध्दाचा नवीन प्रकार असल्याचे सांगत भविष्यात या प्रकारच्या युध्दाच्या धोक्यापासून बचावासीठी सर्व देशांनी तयारी करणे आवश्यक असल्याचे म्हणाले होते.

जनरल रावत यांनी, जर जैविक युद्ध होणार असेल, तर या विषाणू आणि आजारांनी आपली राष्ट्रे बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आपण आपली योजना एकत्र राबवली पाहिजे असे अवहान सदस्य देशांना केले होते. सोबतच प्रत्येक देशाने स्वतःला बळकट केले पाहिजे, त्या बरोबरच जर व्हायरस इतर स्वरूपात बदलणार असेल, तर त्यासाठी आपण तयार राहावे लागेल, सर्वांनी एकत्र येत कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देणे खूप महत्वाचे असल्याचे ते म्हणाले होते.

यापुढे रावत यांनी बोलताना, देशातील कोरोना महामारी सारख्या आरोग्याशी संबंधित आपत्तींच्या काळात जगातील सशस्त्र दलांनी त्यांच्या नागरिकांच्या मदतीसाठी विशेष तयारी केली पाहिजे असे देखील याप्रसंगी सांगीतले होते.

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे, जनरल बिपीन रावत आज तमिळनाडूच्या निलगीरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज विलींग्टन इथं मार्गदर्शनासाठी गेले होते. मात्र, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांचा अपघात झाला. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT