देश

लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी - रिसर्च

नामदेव कुंभार

लसीकरणाचे दोन डोस (Covid vaccination ) घेतल्यानंतर कोरोना संक्रमणापासून अधिक सुरक्षित होऊ शकतो, असं रुग्णालयाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयानं (Indraprastha Apollo Hospital ) शनिवारी लस घेतलेल्या लोकांवरील आपला अहवाल प्रसिद्ध केला. संशोधनानुसार, लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित आहेत. फक्त 0.06 टक्केंना कोरोनामुळे (Covid-19)रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. (Chances of hospitalisation only 0.06% after Covid vaccination: Study)

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाला (Indraprastha Apollo Hospital ) आपल्या संशोधनात असेही दिसून आलं आहे की, लस घेतल्यानंतर प्राथमिक स्वरुपाचं संक्रमण होतं. लस घेतल्यानंतर आयसीयूमध्ये भर्ती अथवा मृत्यू होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. दिल्लीतील आरोग्य कर्मचाऱ्यांवर इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयानं संशोधन केलं होतं. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाने (Indraprastha Apollo Hospital) 3,235 आरोग्य कर्मचार्यांवर संशोधन केलं. यामधील 85 जणांना कोरोनाचं संक्रमण झालं. यामधील 65 म्हणजेच 2.65 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालं होतं. तर 20 जणांनी फक्त पहिला डोस घेतला होता. प्रभावित होणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे.

इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या या संशोधनाला एका पीअर-रिव्यूड मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करन्याची तयारी सुरु आहे. अपोलो हास्पिटल समूहाचे मेडिकल डायरेक्टर आणि सीनियर कंसल्टेंट डाक्टर अनुपम सिब्बल म्हणाले की,' कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामध्ये लसीकरणांनतर कोरोना संक्रमणाची संख्या जास्त आहे. लसीकरणानंतर रोग प्रतिकारक शक्ती वाढत नाही. मात्र, कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून नक्कीच सुरक्षित ठेवते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT