देश

भाजपला रोखण्यासाठी चंद्राबाबूंची पुन्हा धडपड; आघाडी होणार का?

पीटीआय

नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या उद्या राजधानीत येत असून, सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्या भेट घेणार असल्याचे समजते.

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी काल त्यांच्या राजकीय संपर्काची पहिली फेरी केली. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधी, शरद पवार व शरद यादव यांची दिल्लीत, तर सायंकाळी लखनौला जाऊन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेतली. लखनौहून परतल्यानंतर नायडू यांनी आज पुन्हा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधी यांनाही ते भेटले. त्यानंतरच मिळोल्या माहितीनुसार मायावती या उद्या दिल्लीत येऊन सोनिया व राहुल गांधी यांना भेटणार असल्याचे समजले. 
पवार यांच्या घरीही विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांची ये-जा चालू राहिली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव डी. राजा, आम आदमी पार्टीचे खासदार व प्रवक्ते संजयसिंग यांनीही त्यांची भेट घेतली. संजयसिंग यांची भेट सूचक व महत्त्वपूर्ण मानली जाते. विरोधी पक्षांतर्फे समन्वयाची जबाबदारी चंद्रबाबू यांच्यावर तर सोनिया, राहुल व पवार हे दिल्लीतील मोर्चा सांभाळत आहेत. मार्क्‍सवादी नेते सीताराम येचुरी आज राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर त्यांनी नायडू यांच्याशीही चर्चा केली. 

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीत - यूपीएमध्ये कॉंग्रेसखेरीज राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, बिहारमधील हिंदुस्तानी आवाम मोर्चा व राष्ट्रीय लोकसमता पक्ष, झारखंडमधील झारखंड मुक्ति मोर्चा (शिबू व हेमंत सोरेन) यांचा समावेश आहे. ही निवडणूकपूर्व आघाडी आहे. परंतु आघाडीबरोबर असणाऱ्या पक्षांमध्ये चंद्रबाबूंचा तेलुगू देशम पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणणूल कॉंग्रेस, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोकदल यांचे "महागठबंधन' यांचा समावेश नाही.

या सर्वांना निकालापूर्वी एकत्र करण्यामागे हेतू हा आहे की जर या सर्व पक्षांचे संख्याबळ भाजप आघाडीपेक्षा अधिक झाल्यास त्या परिस्थितीत थेट सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. त्यादृष्टीने निकालापूर्वी या पक्षांना एकत्र करण्याच्या हालचालींना गती दिलेली आहे. 

सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी मोर्चेबांधणी

विरोधी पक्षांच्या अंदाजानुसार भाजप आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या आकड्यापेक्षा (273) कमी राहील व त्या तुलनेत प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीचे संख्याबळ अधिक असेल. परंतु सरकारस्थापनेच्या संदर्भात राष्ट्रपतींची भूमिका निर्णायक असल्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपपेक्षा आपले संख्याबळ अधिक असल्याचे दाखविणे आणि सरकारस्थापनेचा दावा करून प्रथम आमंत्रण प्राप्त करण्यासाठी विरोधी पक्षांची ही मोर्चेबांधणी सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT