छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी RSS जोरदार टीका केली आहे, ते म्हणाले भाजपच्या विचारधारेमुळे देशाचे विभाजन झाले,आणि भाजपच विभाजना साठी कारणीभुत आहे. ते म्हणाले, या लोकांना इंग्रज देशाबाहेर जावे असेही वाटत नव्हते. ते कधीही इंग्रजांवर टीका करत नाहीत. आजही ते गांधींवर टीका करत असतात. ते पाटणला रवाना होण्यापूर्वी रायपूरमध्ये पत्रकारांशी चर्चा करत होते.
फाळणी विभिषिका स्मृती दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फाळणीची बीजे सावरकरांनी पेरली होती. हिंदू-मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत हे त्यांनी मान्य केले. मोहम्मद अली जिना यांनी 1937 मध्ये त्यांचा स्वीकार केला. द्विराष्ट्र सिद्धांत सावरकरांनी मांडला होता आणि त्याला जीनांनी पाठिंबा दिला होता. हे लोक फुटीरतावादी असतात. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांची भूमिका काय होती? 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
त्यावेळी त्यांच्या सर्व नेत्यांची विधाने पहा. 1942 मध्ये त्यांचे श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणाले की भारत छोडो आंदोलनात सामील होऊ नका. मुखर्जी व्हाईसरॉयला पत्र लिहून ते कसे दाबायचे हे विचारतात. इंग्रज जाऊ नयेत, असा प्रयत्न यातूनच झाला. ते कधीही इंग्रजांवर टीका करत नाहीत. ते गांधींवर टीका करतात. तुम्ही इंग्रजांच्या विरोधात एका शब्दात तरी टिका करताता का असा सवालही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.