cm dhami uttarakhand landslide esakal
देश

Uttarakhand Landslide: मुसळधार पाऊस अन् भूस्खलन, बचावकार्यासाठी यंत्रणा कामाला! मुख्यमंत्र्यांनी दिले हे मोठे आदेश

CM Dhami on Uttarakhand Landslide: शनिवारी टिहरीच्या टिंगगड गावात दरड कोसळली. यामध्ये 15 निवासी घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून,टिहरी गढवालच्या भिलंगणा विकास गटातील बाल गंगा आणि बुधा केदार भागात अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. स्थानिक लोकांसोबत गुरे आणि इतर पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करा. असे निर्देश देऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आमदार शक्तीलाल शाह आणि जिल्हा मॅजिस्ट्रेट टिहरी गढवाल मयूर दीक्षित ह्यांच्या कडून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. जिथे जिथे दुर्घटना होऊ शकते असा अंदाज घ्या व तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले.

तत्पूर्वी, 27 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि टिहरीचे प्रभारी मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांना घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यास सांगितले. रहिवाशांसोबतच गुरे आणि इतर पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

शनिवारी टिहरी आणि उत्तराखंडमधील इतर ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे 2 जणांना आपला जीव गमवावा लागला. पुरात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री धामी यांनी दिले. यासोबतच या आपत्तीमुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. यासोबतच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. उत्तराखंडमधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनाच्या घटना खूपच वाढल्या आहेत.

शनिवारीच पुन्हा टिहरीच्या टिंगगड गावात दरड कोसळली. यामध्ये 15 निवासी घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मात्र, प्रशासनाने सकाळीच ही घरे रिकामी केली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.भूस्खलनामुळे प्रशासनाने गावातील 50 हून अधिक कुटुंबांना शासकीय आंतर महाविद्यालय विनयखल येथील आपत्ती निवारण शिबिरात ठेवले आहे. येथील आपत्ती निवारण शिबिरात 70 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

वीज, पिण्याचे पाणी, अन्न आणि कपडे या प्राधान्याची व्यवस्था केली जाईल. यासोबतच नुकसानग्रस्तांना मदतीची रक्कम तातडीने देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT