Child Trafficking Case
Child Trafficking Case  esakal
देश

Child Trafficking Case: दिल्लीत बाल तस्करी प्रकरण उघड! CBI छाप्यादरम्यान अनेक बालकांची सुटका...

Sandip Kapde

Child Trafficking Case: बाल तस्करी प्रकरणी सीबीआयने काल दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले. छाप्यादरम्यान सीबीआयच्या पथकाने केशवपुरम येथील घरातून दोन नवजात बालकांसह अनेक जणांची सुटका केली. या प्रकरणी मुलांची विक्री करणाऱ्या महिलेची आणि त्यांना विकत घेतलेल्या व्यक्तीची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने एका महिलेसह काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीचा हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. सध्या सीबीआयचे पथक या प्रकरणी मुलांना विकणाऱ्या महिलेची आणि त्यांना विकत घेतलेल्या व्यक्तीचीही चौकशी करत आहे. छापेमारीच्या वेळी केशव पुरम पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी हजर होते.

सीबीआयने दिल्ली-एनसीआरमधील काही लोकांना अटक केली आहे जे 7-8 मुलांची सुटका केल्यानंतर व्यापार करत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयसह काही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

सीबीआयने दिल्लीत छापे टाकून बाल तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयच्या पथकाने 7-8 मुलांची सुटकाही केली आहे. याप्रकरणी दिल्ली-एनसीआरमधूनही अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून शुक्रवारपासून ही छापेमारी सुरू आहे. हॉस्पिटलमधून नवजात बालके चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT