Quad Summit esakal
देश

Quad Summit : भारतासाठी महत्वाच्या असलेल्या क्वाड समिटमुळे चीनचं पोट का दुखू लागलंय?

क्वाड म्हणजेच क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉगचार

सकाळ डिजिटल टीम

Quad Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ते जपानला पोहोचले. ते येथे G-7 शिखर परिषदेत सहभागी होतील आणि त्याशिवाय द्विपक्षीय चर्चाही करतील. ही भेट देखील विशेष असेल कारण क्वाड ग्रुपचे नेते जपानच्या हिरोशिमा मध्ये भेटणार आहेत.

क्वाड गटाची पुढील बैठक 24 मे रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे प्रस्तावित होती. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भेट रद्द केल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. पण, जपानने जाहीर केलंय आहे की G-7 नंतर ही एक बैठक होणार आहे. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान मोदी क्वाडच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

क्वाड म्हणजे काय?

क्वाड म्हणजेच क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉगचार ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चार देशांची संयुक्त संस्था आहे. हिंद महासागरातील सुनामीनंतर आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांवर सहकार्यासाठी चार देशांनी चर्चा सुरू केली तेव्हा त्याची सुरुवात झाली.

2007 मध्ये जपानने क्वाडचा प्रस्ताव ठेवला होता. तो तयार देखील झाला होता, परंतु तो अंमलात येऊ शकला नाही. हा गट 2017 नंतर कार्यरत झाला. सागरी सुरक्षा आणि व्यापाराच्या हितसंबंधांचा मेळ साधणे हा या गटाचा उद्देश आहे. चीनने या गटाला सातत्याने विरोध केला आहे.

त्यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी क्वाड हे उत्तम माध्यम ठरू शकतं असं मानलं जातंय. पण या संघटनेचे सदस्य असलेले चार देश याला केवळ इंडो-पॅसिफिक प्रदेशातील समान हितसंबंधांचे रक्षण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत आहेत.

भारतासाठी क्वाडचे महत्त्व

भारतीय पॅसिफिक प्रदेश स्वतंत्र ठेवण्यात क्वाड मोठी भूमिका बजावणार आहे. भारत आणि चीनमध्ये सीमेवर अनेकदा तणाव असतो, अशा परिस्थितीत चीनला लगाम घालण्यासाठी क्वाड ही भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. खरे तर, चीनने कधीही भारताच्या कुरापती काढल्या तर क्वाड सदस्य चीनला विरोध करण्यासाठी भारताला पाठिंबा देऊ शकतात.

भारत नौदल आघाडीवरही याचा फायदा घेऊ शकतो आणि धोरणात्मक संशोधनाला चालना देऊ शकतो. 2021 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यान, सर्व क्वाड सदस्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची शपथ घेतली.

चीनचं पोट दुखण्याचं कारण काय?

चीनला क्वाडची अडचण आहे कारण हा गट चीनच्या विस्तारवादी धोरणाला सर्वात मोठा धक्का देतो. चीनला सर्वात मोठी अडचण आहे अमेरिकेची. कारण अमेरिका भारत-पॅसिफिक क्षेत्रात सतत हस्तक्षेप करत आहे. चीनने अनेकवेळा या गटाला आशियाई नाटो असे संबोधले आहे.

अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे देश एकत्र आल्यापासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या समस्यांवर काम करत आहेत. चीनच्या पोटदुखीचं हेच कारण आहे. या चार देशांनी खंबीरपणे भारतीय पॅसिफिक क्षेत्रातील सर्व समस्यांवर मात केल्यास चीनचे वर्चस्व कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT