Supreme Court 
देश

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हक्क मान्य; कायद्याच्या वैधतेबाबतच निर्णय लगेच अशक्य - SC

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी केली. ही सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले आहे की, आता लगेच या कायद्यांच्या वैधतेचा निर्णय घेता येणार नाही. पुढे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, आम्ही आज फक्त एकाच गोष्टीबाबत निर्णय देऊ शकतो ते म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलन करण्याच्या मुलभूत अधिकाराबाबत. मात्र, कायद्यांच्या वैधतेचा निर्णय नंतर घेता येईल.

शेतकऱ्यांना निषेध करण्याचा अधिकार आहे. आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही परंतु निषेधाची पद्धत अशी आहे की आम्ही त्याकडे लक्ष देऊ. आम्ही केंद्राला विचारू इच्छितो की निषेधाची पद्धत काय आहे? त्याचा नागरिकांच्या चळवळीच्या अधिकारावर परिणाम होणार नाही, हे पहायला हवे. सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं की आपल्याला हे  पहायला हवं की शेतकरी आपले  प्रदर्शनदेखील करतील आणि लोकांच्या अधिकारांचं उल्लंघन देखील होणार नाही. केंद्र सरकारकडून बाजू मांडणारे वकील हरिश साळवे यांनी म्हटलं की, आंदोलनकर्त्यांनी दिल्लीकडे येणारे रस्ते ब्लॉक केले आहेत. त्यामुळे दुध, फळ आणि भाज्यांचे दर वाढलेले आहेत. पुढे त्यांनी म्हटलं की, आपण शहराला बंदी बनवून आपल्या मागण्या पूर्ण करु शकत नाही.

त्यांनी म्हटलं की, विरोध करण्याच्या मौलिक अधिकार निश्चितच आहे मात्र हा अधिकार दुसऱ्यांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणारा नसावा. यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की, आम्ही या कायद्याचा निषेध करण्याचा मूलभूत अधिकार ओळखतो आणि त्यास आळा घालण्याचा प्रश्नच नाही. पण सध्या आपण केवळ एकाच गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो ते म्हणजे यामुळे एखाद्याच्या आयुष्याचे नुकसान होऊ नये.

जोवर सार्वजनिक मालमत्ता आणि एखाद्याचं आयुष्य धोक्यात आणलं जात नाही तोवर निषेध संवैधानिकच ठरतो. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांनी चर्चा करायला हवी. आम्ही एका तटस्थ आणि स्वतंत्र समितीचा विचार करत आहोत ज्यांच्यासमोर दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडतील. याबाबत पी. साईनाथ, भारतीय किसान युनियन आणि इतर सदस्यांसहित एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, असा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे. आंदोलनकर्ते याप्रकारे हिंसा आणि शहराला वेढा घालू शकत नाही. ही  समिती आपला अहवाल मांडेल. दरम्यान निषेध सुरु राहण्यास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT