arvind kejriwal
arvind kejriwal 
देश

दिल्लीत लष्कराला बोलवा; अरविंद केजरीवालांची मागणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) राजधानी दिल्लीत पेटलेला आंदोलनाचा वणवा शांत करण्यासाठी लष्काराला पाचारण करण्यात यावे. दिल्ली पोलिस परिस्थिती नियंत्रणात अपयशी ठरल्याचे दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीत सलग तीन दिवस आंदोलन झाल्यानंतर आज (बुधवार) धग कमी झालेली आहे. ईशान्य दिल्लीतील चार विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून आंदोलकांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत वीस जणांचा बळी गेला असून, ५६ पोलिस कर्मचाऱ्यांसह दोनशे लोक जखमी झाले आहेत. जाफराबाद-मौजपूर-सीलमपूर-गोकूळपुरी, कबीरनगर, कर्दमपूर या टप्प्यातील ब्रह्मपुरी, मौजपूर भागांत जाळपोळ, लुटालूट व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी आंदोलन केले. पहाटे साडेतीनच्या सुमारास पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगविण्यात आले. 

केजरीवाल यांनी म्हटले आहे, की दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक आहे. पोलिस सर्व प्रयत्न करूनही स्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरत आहे. लष्काराला बोलावून दंगलप्रभावित भागांमध्ये संचारबंदी लागू केली पाहिजे. या विषयी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT