देश

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा

ओमकार वाबळे

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनात मारले गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलनात ज्या शेतकऱ्यांनी आपली माणसं गमावली त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला कोणत्याही अटीशिवाय पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेची माहिती त्यांचे सुपूत्र केटीआर यांनी ट्विट करून दिली. ते राज्यात मंत्री आहेत. त्यांनी ट्विट केलं की, गेल्या एका वर्षात अनेक शेतकरी कुटुंबांनी कृषी कायद्यांविरोधात लढताना आपले लोक गमावले आहेत. तेलंगणा सरकारने या आंदोलनात प्राण गमावलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केलीय.

तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर म्हणाले की, आता केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले बिनशर्त मागे घ्यावेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रानेही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

भाजपची गोची?

तेलंगाणासारख्या लहान राज्याने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहात त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने फक्त कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. अद्याप याबद्दल अंमलबजावणी झाली नाही. वर्षभरापासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदतही जाहीर केलेली नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर खटले दाखल केले आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT