देश

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा

ओमकार वाबळे

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनात मारले गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलनात ज्या शेतकऱ्यांनी आपली माणसं गमावली त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला कोणत्याही अटीशिवाय पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेची माहिती त्यांचे सुपूत्र केटीआर यांनी ट्विट करून दिली. ते राज्यात मंत्री आहेत. त्यांनी ट्विट केलं की, गेल्या एका वर्षात अनेक शेतकरी कुटुंबांनी कृषी कायद्यांविरोधात लढताना आपले लोक गमावले आहेत. तेलंगणा सरकारने या आंदोलनात प्राण गमावलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केलीय.

तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर म्हणाले की, आता केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले बिनशर्त मागे घ्यावेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केंद्रानेही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

भाजपची गोची?

तेलंगाणासारख्या लहान राज्याने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहात त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने फक्त कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. अद्याप याबद्दल अंमलबजावणी झाली नाही. वर्षभरापासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदतही जाहीर केलेली नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर खटले दाखल केले आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT