Yogi Adityanath Team eSakal
देश

योगी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; 77 कोटींचं पॅकेज जाहीर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने हे पॅकेज जाहीर केलं.

सुधीर काकडे

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने 77.88 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील सुमारे 2.35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पिकांच्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर सरकारने मदत पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे योगी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 77,88,96,748 रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यानुसार उत्तर प्रदेशमधील 35 जिल्ह्यांतील 2,35,122 शेतकऱ्यांना या पॅकेजचा फायदा होणार आहे. शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीचा आढवा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल मनोजकुमार सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, पूर आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यानुसार 35 जिल्ह्यांमध्ये 2,35,122 शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे.

देवरिया, महाराजगंज, सिद्धार्थ नगर, गोरखपूर, मिर्झापूर, संत कबीर नगर, सीतापूर, कुशी नगर, बलिया, बहराइच, मौ, वाराणसी, झाशी, गाझीपूर, बाराबंकी, जालौन, खेरी, ललितपूर, चंदौली, कौशांबी, आंबेडकरनगर , बिजनौर, बस्ती, गोंडा, चित्रकूट, बलरामपूर, बांदा, औरैया, फर्रुखाबाद, पीलीभीत, लखीमपूर, कानपूर देहाट, भदोही, सुलतानपूर, आग्रा, आणि श्रावस्ती या 35 जिल्हयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT