Coal
Coal sakal
देश

वीजसंकट आणखी गडद; सात वर्षानंतर पहिल्यांदाच कोळसा आयात करणार

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारतीय कोळसा कंपनी कोल इंडिया भारतातील वीज तुटवडा भरून काढण्यासाठी इंधनाची आयात करणार आहे. देशात वीज तुटवड्यामुळे त्रास होऊ नये म्हणून केंद्रीय उर्जा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस भारतातील वीजसंकट आणखी गडद होत असून त्यामुळे भविष्यात त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील सर्वांत मोठी कोळश्याची खाण असलेली कोल इंडिया आयात केलेल्या कोळश्याचा वीज बनवण्यासाठी वापर करणार आहे.

(Coal Import)

दरम्यान २०१५ साली कोल इंडियाने इंधनाची आयात केली होती. यावर्षीच्या एप्रिलमध्ये राज्यात आणि देशभरात वीजतुटवडा निर्माण झाला होता. ही परिस्थिती परत उद्भवू नये यासाठी केंद्रीय आणि राज्यातील उर्जा मंत्र्याने हा निर्णय घेतला आहे. मागच्या सहा वर्षातील वीजेसंदर्भातील परिस्थिती रोखण्याचं मुख्य आव्हान देशासमोर आहे. "कोल इंडिया हा भारतातील सरकार ते सरकार वीज पुरवण्यासाठी कोळसा आयात करेल आणि देशात वीज पुरवठा करेल." असं केंद्रीय उर्जामंत्रालयाने सांगितलं आहे.

यासंदर्भातील पत्र सर्व केंद्रीय उर्जा अधिकारी, राज्यातील अधिकारी आणि कोल इंडियाच्या चेअरमन यांना पाठवण्यात आलं आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारतात वीजेच्या तुटवड्यामुळे त्रास सहन करावा लागला होता. उर्जामंत्रालयाने दिलेल्या पत्रात म्हटलंय की, राज्यांद्वारे कोळसा आयातीच्या अनेक निविदांमध्ये गोंधळ निर्माण होईल त्यासाठी कोल इंडियाद्वारे केंद्रीकृत खरेदीची मागणी केली आहे. परंतु ऊर्जा मंत्रालयाने शनिवारी राज्यांना प्रक्रियेत असलेल्या निविदा स्थगित करण्यास सांगितले.

"कोळसा आयात करण्यासाठी राज्य जनरेटर आणि IPPs द्वारे सुरू असलेल्या निविदा कोल इंडियाच्या किमतीच्या शोधाची प्रतीक्षा करण्यासाठी स्थगित ठेवल्या जाऊ शकतात, जेणेकरून कमीत कमी संभाव्य दराने कोळसा खरेदी करता येईल," असं मंत्रालयाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT