Team eSakal
देश

"...म्हणून कोळसा टंचाई निर्माण झाली"; केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण

देशात सध्या कोळसा टंचाई निर्माण झाली असून, अनेक राज्य अंधारात जाण्याची भिती आहे.

सुधीर काकडे

देशावर सध्या कोळशाच्या तुटवड्याचे संकट ओढावले असून, या संकटामुळे सध्या अनेक राज्य अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण कोळशाअभावी देशातील 17 राज्यातील 135 वीज केंद्रापैकी 46 विज निर्मिती केंद्र क्रिटिकल व 45 केंद्र सुपर क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. याच परिस्थितीवर आज देशाचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोळसा संकटाच्या कारणांची माहिती दिली, तसेच देशात सोमवारी विक्रमी कोळसा पुरवठा झाला असून, कोल इंडिया आणि कोळसा मंत्रालय देशाची मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही सांगितले आहे..

सप्टेंबर महिन्यात कोळसा खाणींच्या आसपास मुसळधार पाऊस पडल्याने, खाणीतून कोळसा काढण्याची आणि पुरवठा करण्याची प्रक्रिया खंडित झाली. ज्यामुळे कोळशाचं संकट निर्माण झाली असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय किंमती 60 रुपयांवरून 190 रुपये प्रति टन वाढल्या. त्यानंतर, आयात केलेले कोळसा उर्जा प्रकल्प एकतर 15-20 दिवस बंद असतात किंवा खूप कमी उत्पादन करतात. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT