jairam ramesh 
देश

‘जनधन’ची ७ वर्षे! काँग्रेस म्हणतंय, नाव बदलून श्रेय घेण्यात मोदींना प्राविण्य

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पंतप्रधान जन-धन योजनेमुळे (पीएमजेडीवाय) अगणित देशवासियांना आर्थिक नियोजन, सशक्तीकरण व सन्मानपूर्वक जीवन मिळाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या महत्वाकांक्षी योजनेची प्रशंसा केली. जन-धन योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

मात्र, यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. ही योजना मोदी सरकारची नसून ती मुळात यूपीए आघाडीचीच आहे. तिचं नाव फक्त भाजप सरकारने बदलून लोकांसमोर आणलं आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधानांनी जनधन योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे. मात्र, वास्तवात यूपीए आघाडीच्याच मुलभूत बचत योजनेचं नामांतरण केल्याची ही सात वर्षे पूर्ण झाली आहेत. रिनेमिंग, रिपॅकेजिंग आणि रिलाँचिंगमध्ये यांना प्राविण्या प्राप्त आहे.

मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर येताच राबविलेल्या काही ठळक योजनांत २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या जन धन योजनेचा क्रमांक वरचा आहे. ज्यांची बॅंकेत खाती नव्हती अशा लाखो गरिबांनी यामुळे बॅंकांमध्ये खाती उघडली. या योजनेमुळे भारताच्या विकासाची गती कायमस्वरूपी बदलली असे सांगून मोदी यांनी म्हटले, की ज्यांनी कधी बॅंकेही पाहिली नव्हती अशा गरीब वर्गाच्या आर्थिक सशक्तीकरणाचे ही योजना भक्कम माध्यम ठरली आहे. या योजनेने वित्तीय लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यात मोठी व मजबूत पारदर्शकताही आणली आहे. या योजनेचे यश हे ती राबविणाऱ्यांचे आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी म्हटले, की योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे भारताच्या अगणित लोकांचे जीवन आणखी सुखकर व चांगले बनविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT