Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Raghuram Rajan  esakal
देश

Raghuram Rajan : कोण म्हणतं राहुल गांधी 'पप्पू' आहेत, ते पप्पू नाहीत तर..; काय म्हणाले RBI चे माजी गव्हर्नर?

काँग्रेसची भारत जोडो यात्रा काही महिन्यांपासून सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रेच्या मूल्यांसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्याचंही राजन म्हणाले.

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) याचं नेतृत्व करत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलंय.

राजन म्हणाले, राहुल गांधींची 'पप्पू' प्रतिमा खूपच दुर्दैवी आहे. काँग्रेसचा हा खासदार 'पप्पू' नसून हुशार व्यक्ती आहे. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे वक्तव्य केलंय.

राजन पुढं म्हणाले, 'मला वाटतं की राहुल गांधींची 'पप्पू' प्रतिमा दुर्दैवी आहे. त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात मी जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही अर्थानं मला 'पप्पू' वाटत नाहीत. राहुल एक हुशार, तरुण, जिज्ञासू व्यक्ती आहे.'

भारत जोडो यात्रेच्या मूल्यांसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्याचंही राजन म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. कारण, मी पदयात्रेच्या मूल्यांसाठी तिथं गेलो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT