Narendra Modi
Narendra Modi  sakal media
देश

चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार?

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : चीनने भूतानच्या हद्दीत चार गाव वसविले असून ही गावे डोकलाम भागापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दिव्य मौनात आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच, चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार आणि प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही कॉंग्रेसने केला आहे.

काँगग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी भूतान हद्दीतील चिनी गावावरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड चालविल्याचा आरोप केला. चीनच्या सीमाभागातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार आणि प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांनुसार चीनने भूतानच्या हद्दीत चार गावे वसविली असून ही गावे भारताच्या ईशान्य भाग आणि उर्वरित भागाला जोडणाऱ्या चिकन नेक या संवेदनशील क्षेत्रासाठी महत्त्वाच्या डोकलामपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. ही चार गावे मे २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत वसली आहेत, असा दावा गौरव वल्लभ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबद्दल दिव्य मौनात आहेत. या चिनी आक्रमकतेबद्दल मोदी गप्प का आहे, चीनबद्दल विस्तारवादी शक्ती यासारख्या पर्यायवाचक शब्दांचा आधार घेऊन बोलण्याऐवजी थेट प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही गौरव वल्लभ यांनी केला. अभिनेत्री कंगना रानावतवर जोरदार टीकास्त्र सोडताना गौरव वल्लभ यांनी कंगनाचा उल्लेख अज्ञानी सरकारी कलावंत असा केला. असे लोक महात्मा गांधींचा अपमान करतात आणि सरकार काहीही बोलत नाही.

वल्लभ यांनी, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरक म्हणजे महात्मा गांधींनी आचरण केले तो हिंदू धर्म तर नथुराम गोडसेने आचरण केले ते हिंदुत्व, अशी व्याख्याही केली. तसेच कंगना रानावतचे पुरस्कार परत घेऊन तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT