Narendra Modi  sakal media
देश

चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार?

भूतानच्या हद्दीत गाव वसल्याने काँग्रेसचे केंद्रावर टीकास्त्र; थेट प्रत्युत्तर कधी देणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : चीनने भूतानच्या हद्दीत चार गाव वसविले असून ही गावे डोकलाम भागापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दिव्य मौनात आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच, चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार आणि प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही कॉंग्रेसने केला आहे.

काँगग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी भूतान हद्दीतील चिनी गावावरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड चालविल्याचा आरोप केला. चीनच्या सीमाभागातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार आणि प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांनुसार चीनने भूतानच्या हद्दीत चार गावे वसविली असून ही गावे भारताच्या ईशान्य भाग आणि उर्वरित भागाला जोडणाऱ्या चिकन नेक या संवेदनशील क्षेत्रासाठी महत्त्वाच्या डोकलामपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. ही चार गावे मे २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत वसली आहेत, असा दावा गौरव वल्लभ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबद्दल दिव्य मौनात आहेत. या चिनी आक्रमकतेबद्दल मोदी गप्प का आहे, चीनबद्दल विस्तारवादी शक्ती यासारख्या पर्यायवाचक शब्दांचा आधार घेऊन बोलण्याऐवजी थेट प्रत्युत्तर कधी देणार, असा सवालही गौरव वल्लभ यांनी केला. अभिनेत्री कंगना रानावतवर जोरदार टीकास्त्र सोडताना गौरव वल्लभ यांनी कंगनाचा उल्लेख अज्ञानी सरकारी कलावंत असा केला. असे लोक महात्मा गांधींचा अपमान करतात आणि सरकार काहीही बोलत नाही.

वल्लभ यांनी, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरक म्हणजे महात्मा गांधींनी आचरण केले तो हिंदू धर्म तर नथुराम गोडसेने आचरण केले ते हिंदुत्व, अशी व्याख्याही केली. तसेच कंगना रानावतचे पुरस्कार परत घेऊन तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT